सांस्कृतिक पुरस्कार

श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य विद्याशंकरभारती, पीठ करवीर यांनी वैदिक परंपरा जोपासणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला धर्मपीठाकडून मान्यता मिळावी, त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या उद्देशाने श्री आद्य शंकराचार्य वैदिक पुरस्कार देण्यास आरंभ केला. वैदिक क्षेत्राबरोबरच धार्मिक, कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यास सुरुवात केली.

या सांस्कृतिक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील किंवा प्रसंगी महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींची निवड केली जाते. त्यासाठी सांस्कृतिक, सामाजिक व अन्य लोकोपयोगी कार्य करण्याऱ्या महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींची निवड होते. उत्तम कीर्तनकार. प्रवचनकार, संगीत गायक कलाकार व वाड्मयीन-साहित्य क्षेत्रातील उत्तम कवी, लेखक, नाटककार यांचीही निवड होते. कलाक्षेत्रातील उच्चतम पदवी असणाऱ्या कलावंतांचीही गुणवत्ता पाहून पुरस्कारासाठी विचार केला जातो. २००१ पासून सांस्कृतिक पुरस्कार कै. पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे नावे सुरु आहे.

महत्वाची टीप:

१. वरील पुरस्कार त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींना एकदाच देता येतात.

२. वरील पुरस्काराचे स्वरूप प्रत्येक रु. ५,०००/- (रुपये पाच हजार) मात्र रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुष्पहार, शाल, श्रीफळ असे आहे.

Open chat
श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर संदर्भात अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा :
https://shankaracharyakarveer.org/ आपण थेट पीठाच्या खालील पत्त्यावर समक्ष भेट देऊ शकता
पत्ता: श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर – २२९९, “डी”, शुक्रवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ००२ महाराष्ट्र